अवकाळी पाऊस, बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल भिजला.

वाशिम, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वाशिम शहरात अवकाळी पाऊस झाला असून त्यामुळं वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतकऱ्यांचा शेतमाल भिजून मोठं नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर असल्यामुळं शेतकऱ्यांना रस्त्यावर उघड्यावर माल टाकावा लागला होता. दुपारी अचानक पाऊस आला आणि त्यात शेतकऱ्यांचा सोयाबिन, तूर, हरभरा हा शेतमाल भिजला.
यापूर्वी सुद्धा अनेकवेळा असाच प्रकार अनेक वेळा घडलेला असतांना कृषी बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात कोणतीही काळजी घेतली नसल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.Unseasonal rain, farmers’ goods got soaked in the market committee.
ML/KA/PGB
15 Feb 2024