सर्वसामान्यांसाठीचा हा अर्थसंकल्प

 सर्वसामान्यांसाठीचा हा अर्थसंकल्प

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात आनंद फुलवणारा हा अर्थसंकल्प आहे, यामुळे राज्याची अर्थव्यवस्था देशाला साह्यभूत होईल अशी आशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.शेतकऱ्यांना सर्वप्रकारची मदत केली जाईल असं ही ते म्हणाले.

अर्थसंकल्पातील वित्तीय तूट ही रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेतच आहेत , कोणत्याही परिस्थितीत अनैसर्गिक वाढ अर्थसंकल्पात केलेली नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

आपल्या स्थूल उत्पन्नाच्या प्रमाणात कर्ज काढता येते, त्या मर्यादेच्या प्रमाणापेक्षा आपण कमीच आहोत , पंचवीस टक्के इतकी ती मर्यादा आहे प्रत्यक्षात कर्ज प्रमाण सतरा टक्केच आहे असं ते म्हणाले.

ML/KA/SL

9 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *