“पागडी भाडेकरूंच्या दीर्घ संघर्षाला आता आशेचा किरण”
मुंबई, दि ७
गेल्या ४० वर्षांपासून पागडी भाडेकरू पुनर्विकासाची वाट पाहत आहेत. या काळात अनेक कुटुंबांनी अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगले आहे. जीर्ण आणि असुरक्षित इमारतींमध्ये राहण्याची सक्ती, सततची अनिश्चितता आणि दीर्घकाळ चाललेला विलंब यामुळे रहिवाशांनी मोठ्या प्रमाणावर त्रास, असुरक्षितता आणि मानसिक तणाव सहन केला आहे. अनेक पिढ्या या प्रतीक्षेत संपून गेल्या, मात्र सुरक्षित आणि सन्मानजनक घराचे स्वप्न अद्याप अपूर्णच आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर माननीय उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीसमोर हा प्रश्न होता की या इमारती खरोखरच धोकादायक अवस्थेत आहेत का किंवा पूर्वीची प्रक्रिया योग्य पद्धतीने आणि नियमानुसार झाली होती का. मात्र आता न्यायाधीश समितीच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे की या इमारती प्रत्यक्षात जीर्ण आणि असुरक्षित अवस्थेत आहेत आणि मानवी जीवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने पुनर्विकास होणे अत्यावश्यक आहे.
पागडी एकता संघचे अध्यक्ष मुकेश साहा पेंडसे यांनी पागडी भाडेकरूंच्या वतीने स्पष्ट केले आहे की अनेक वर्षांच्या प्रतीक्षा आणि समोर आलेल्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर हा विषय आता तातडीने गांभीर्याने घेतला जावा, जेणेकरून पुनर्विकास प्रक्रिया कोणत्याही विलंबाशिवाय पुढे जाऊ शकेल.
या पार्श्वभूमीवर आम्ही मनापासून अपेक्षा करतो की माननीय सर्वोच्च न्यायालय १२ मे रोजी होणाऱ्या सुनावणीत या महत्त्वपूर्ण अहवालाची दखल घेईल. यामुळे वर्षानुवर्षे अडकलेला पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होऊन लाखो भाडेकरूंना अखेर दिलासा मिळू शकेल.
आजच्या परिस्थितीत हे पागडी भाडेकरूंकरिता एक आशेचे किरण आहे, ज्यातून सुरक्षित आणि सन्मानजनक भविष्याची नवी सुरुवात होण्याची अपेक्षा असल्याची माहिती पागडी एकता संघाचे अध्यक्ष मुकेश शाह पेंडसे यांनी दिली.KK/ML/MS