मुंबई उच्च न्यायालयाचा समीर वानखेडेंना पुन्हा दिलासा
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपप्रकरणी केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून पुन्हा दिलासा मिळाला.वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा रद्द करा, अशी मागणी सीबीआयने उच्च न्यायालयाकडे केली होती.
त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला.
समीन वानखेडे यांच्याविरोधातील आरोप सकृतदर्शनी खरे असल्याचे आढळून आले आहेत. तसेच हे आरोप अत्यंत गंभीर आणि संवेदनशील स्वरूपाचे आहेत. सरकारी सेवेतील अधिकाऱ्याने खासगी व्यक्तींच्या साथीने भ्रष्टाचार करणे, फौजदारी कट रचून खंडणीसाठी धमकावल्याचे हे आरोप आहेत. त्यामुळे वानखेडे यांना अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा कायम ठेवण्यात आल्यास प्रकरणाच्या तपासावर त्याचा विपरीत परिणाम होतील, असा दावा सीबीआयने उच्च न्यायालयात बुधवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे केला होता.परंतु न्यायालयाने वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.यापूर्वी वानखेडे
यांना 8 जून पर्यत अटकपूर्व जामीन मिळाला होता. हा जामीन आता 23 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान, याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी समीर वानखेडे यांच्या वकिलाने न्यायालयात केली आहे.
ML/KA/PGB
8 Jun 2023