हतनूर धरणातील पाण्याचा विसर्ग, तापीची पातळी वाढली

 हतनूर धरणातील पाण्याचा विसर्ग, तापीची पातळी वाढली

नंदुरबार दि १९:– हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे तापी नदीची पातळी वाढली आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. प्रशासनाने तापी नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नदीपात्रात न जाण्याचं आवाहन केलं आहे.

हतनूर धरणातून आज दुपारी १२ वाजता १,५७,३९९ क्यूसेक पाणी सोडण्यात आलं आहे. येत्या काही तासांत हा विसर्ग १,७५,००० क्यूसेकपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सारंगखेडा बॅरेजमधून सध्या १,०१,८८३ क्यूसेक आणि प्रकाशा बॅरेजमधून १,१६,६३१ क्यूसेक पाणी सोडलं जात आहे.

शेळगाव आणि सुलवाडे बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे येत्या १२ ते २४ तासांत प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग २,००,००० ते २,५०,००० क्यूसेकपर्यंत वाढवला जाईल. तापी नदीच्या पात्रात कोणीही आपली गुरंढोरं सोडू नये. पात्रात जाऊ नये. नदीकाठी असलेले पाण्याचे पंप आणि इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजमधील पाण्याची पातळी धोकादायक पातळीपेक्षा कमी आहे, मात्र विसर्ग वाढल्यास पाणी पातळी वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असा ईशारा प्रशासनाने दिला आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *