या तारखेपर्यंत e-KYC न केल्यास रेशन कार्ड होणार बंद

 या तारखेपर्यंत e-KYC न केल्यास रेशन कार्ड होणार बंद

मुंबई, दि. २८ : रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे. याअंतर्गत E-KYC वेळेवर झाले नाही तर शिधापत्रिकेवरून नाव काढून टाकले जाऊ शकते आणि मोफत किंवा स्वस्त रेशन उपलब्ध होणे बंद होऊ शकते.

E-KYC मुळे रेशनचे फायदे फक्त योग्य आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचतील. सरकारने यापूर्वी ३१ मार्च २०२५ ही शेवटची तारीख निश्चित केली होती. परंतु अनेक लोकांना तांत्रिक समस्या आणि माहितीचा अभाव जाणवला. त्यामुळे आता ती तारीख ३० जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ऑनलाइन प्रक्रियेसाठी, तुम्ही ‘मेरा रेशन’ किंवा ‘आधार फेस आरडी’ सारखे अॅप्स वापरू शकता. गुगल प्ले स्टोअर वरून हे अ‍ॅप्स डाउनलोड करा, तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा. त्यानंतर फेस स्कॅनिंगसाठी कॅमेरा चालू करून प्रक्रिया पूर्ण करा.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *