मेट्रो तीन ची सेवा सुरळीत, प्रवाशांना धोका नाही

मुंबई दि २६– आचार्य अत्रे मेट्रोस्थानकाच्या ज्या भागाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही त्या भागात पावसाच्या पाण्याची गळती झाली असून त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला कोणताही धोका नाही, मेट्रो तीन मार्ग मधील आरे ते वरळी ही मेट्रो सेवा नियमितपणे सुरू असल्याचे स्पष्टीकरण मेट्रो तीनच्या वतीने देण्यात आले आहे.
वरळी येथील आचार्य अत्रे मेट्रोस्थानकात ज्या भागातून प्रवाशांना प्रवेश देण्यात आलेला नाही अशा भागातच सध्या पावसामुळे पाणी गळती झाली आहे, असे मेट्रो तीन ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वरळी ते आचार्य अत्रे चौक यादरम्यानची मेट्रो सेवा सध्या तात्पुरती थांबवण्यात आली आहे मात्र वरळी ते आरे यादरम्यानची मेट्रो सेवा सुरळीतपणे सुरू आहे.
आचार्य अत्रे मेट्रोस्थानकाच्या बाहेर असणारी संरक्षक भिंत अचानकपणे मुसळधार पावसाने कोसळली, यामुळे या परिसरात पाणी आले असेही या स्पष्टीकरणात मेट्रो तीन ने म्हटले आहे. या भागाचे काम येत्या तीन महिन्यात पूर्णत्वाला जाईल त्यानंतरच तो प्रवाशांसाठी खुला केला जाईल असेही या स्पष्टीकरणात सांगण्यात आले आहे.ML.MS