सांगलीत ओढे, नाले, बंधारे भरून वाहू लागले…

सांगली दि २६– सततच्या पावसामुळे सांगली जिल्ह्यात ओढे, नाले, बंधारे व विहिरी भरून वाहू लागल्या आहेत. कृष्णा व वारणा नदीकाठच्या अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे. लोकांना राहण्यासाठी तात्पुरता आसरा शोधावा लागत आहे. कृष्णा नदीकाठच्या काही गावात होड्यांची गरज निर्माण झाली आहे. शेतातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे हाती घेण्यात आले आहेत.
येरळा नदीवरील आंधळी व राजापूर येथील दोन पूल पाण्याखाली गेले आहेत. उसात अनेक ठिकाणी पाणी साचले असून भाजीपाला, पिके कुजून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ML.MS