पाकिस्तानच्या 5,033 भिकाऱ्यांची सौदी अरबमधुन हकालपट्टी

 पाकिस्तानच्या 5,033 भिकाऱ्यांची सौदी अरबमधुन हकालपट्टी

इस्लामाबाद, दि. १५ : सातत्यपूर्ण अशांततेमुळे अस्थिर झालेला पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या डबघाईला आला आहे. यामुळे सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. यामुळेच गरिबीने त्रस्त झालेले काही लोक अन्य देशाचा रस्ता धरुन तिथे भिक मागण्याचे काम करत आहे. जगभरातील देश आता पाकिस्तानी भिकाऱ्यांमुळे त्रस्त झाले आहेत.

गेल्या जवळपास दीड वर्षांमध्ये सौदी अरबने असे 5,033 पाकिस्तानी भिकारी त्यांच्या देशातून हाकलवून लावले आहेत. त्याचसोबत इतर देशांनीही त्यांच्या देशातून पाकिस्तानी भिकाऱ्यांना परत पाठवण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय.

पाकिस्तान सरकारचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी संसदेत डेटा सादर केला. त्यामध्ये भीक मागण्याच्या आरोपाखाली परदेशातून किती पाकिस्तानींना परत पाकिस्तानात पाठवण्यात आले हे समोर आलं. जानेवारी 2024 पासून सौदी अरेबिया, इराक, मलेशिया, ओमान, कतार आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून एकूण 5,402 पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. इतर पाच देशांमध्ये 369 पाकिस्तानी भीक मागताना पकडले गेले.

सौदी अरेबियानंतर इराकमधून सर्वाधिक 247 पाकिस्तानी भिकाऱ्यांना परत पाठवण्यात आले. युएईने हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला आहे आणि पाकिस्तानी नागरिकांवर कडक व्हिसा निर्बंध लादले आहेत. गेल्या 3 वर्षांत, जगभरातील देशांमध्ये 50,000 पाकिस्तानी भीक मागताना आढळले.

मोहसीन नक्वी यांच्या मते, 2025 मध्ये आतापर्यंत, म्हणजेच गेल्या चार महिन्यांत 552 पाकिस्तानी नागरिकांना वेगवेगळ्या देशांमधून भीक मागण्याच्या आरोपाखाली पाकिस्तानात परत पाठवण्यात आले. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’च्या वृत्तानुसार, 2024 मध्ये अनेक देशांनी 4850 पाकिस्तानींना भीक मागण्याच्या आरोपाखाली हद्दपार केले होते. पाकिस्तानातील लोक धार्मिक प्रवासाच्या नावाखाली सौदी अरेबियाला व्हिसा घेतात आणि तिथे पोहोचल्यानंतर ते भीक मागतात असं समोर आलं.

पाकिस्तान सरकारच्या आकडेवारीकडे पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की पाकिस्तानमध्ये असा एकही भाग नाही जिथे लोक भिकारी नाहीत. पाकिस्तान म्हणतो की त्यांच्या पंजाब आणि सिंध प्रांतातील लोक श्रीमंत आहेत, तर सरकारी आकडेवारीनुसार, या दोन्ही प्रांतातील लोकांना भीक मागताना पकडले गेले आणि नंतर तेथून हाकलून लावले गेले.

पाकिस्तान सरकारने भिकाऱ्यांच्या निर्यातीसंबंधी कठोर पावले उचलली आहेत. 2024 मध्ये, सरकारने 4,300 भिकाऱ्यांची नावे Exit Control List (ECL) मध्ये समाविष्ट केली आहेत. त्यामुळे त्यांना देशाबाहेर जाण्यापासून बंदी घालण्यात आली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *