पत्रकार अश्विन अघोर यांचे असाध्य आजाराने निधन

ठाणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रभक्त पत्रकार अश्विन अघोर यांचे असाध्य आजाराने आज दुर्दैवी निधन झाले. ते ५० वर्षाचे होते, त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. अश्विन यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार दिनांक १७ फेब्रु. रोजी सकाळी ठाण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.तत्पूर्वी ठाणे पश्चिमेकडील तुलसीधाम,त्रिनिटी सोसायटी येथील घरी सकाळी ८.३० ते १० त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले.
मुंबईसह ठाण्यात इंग्रजी दैनिकात पत्रकारिता करणारे अश्विन अघोर यांनी मागील काळात स्वतःचे ‘ घनघोर ‘ नावाचे यूट्युब चॅनेल सुरु केले होते. अश्विन हे पर्यावरण अभ्यासक देखील होते. त्यांना यकृताचा आजार जडल्याने गेले काही दिवस त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपीटर रुग्णालयात उपचार सुरु होते.मात्र, दुर्दैवाने उपचारा दरम्यान शुक्रवारी दुपारी त्यांचे निधन झाले. अश्विन यांच्या निधनाने ठाण्याच्या पत्रकारितेत पोकळी निर्माण झाली आहे. ठाणे शहर दैनिक पत्रकार सघ तसेच ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने अश्विन अघोर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
ML/KA/SL
16 Feb. 2024