समाजकार्याला सहकार्य हे उद्योगांचे दायित्वच

ठाणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्योगधंद्यांनी सामाजिक दायित्व निभावणे म्हणजे नेमके काय याचा मूळ अर्थ समजावून घेणे आवश्यक आहे. ही केवळ धर्मादाय बाब नाही आणि दान ही नाही तर हा सहयोग आहे , समाजासाठी केलेलं दायित्व आहे असे मत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्रसिंह यांनी व्यक्त केलं आहे. ठाणे जिल्ह्यातील उत्तन इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ने आयोजित केलेल्या यासंदर्भातील एकदिवसीय चर्चासत्रात ते आज बोलत होते.
गॅस सिलेंडर ची सबसिडी त्यागण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करताच देशातील वीस कोटी नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असे ते म्हणाले. अंतराळ क्षेत्र आजवर पडद्या आड होते ते मोदींनी खासगी क्षेत्रासाठी खुले केले, गेल्या आठ महिन्यात त्यात एक हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे असे ही डॉ सिंह यांनी सांगितले.
सीएसआर योजनेला दहा वर्ष पूर्ण झाली त्यातील मोठ्या सहभागामुळे पंचवीस हजार कोटी इतका निधी सीएसआर च्या माध्यमातून उभा राहत आहे , कृषी आणि विज्ञान या क्षेत्रातही आता सीएसआर चा मोठा उपयोग होतो आहे असे डॉ जितेंद्रसिंह यांनी सांगितले.
सीएसआर योजनेला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने या योजनेचे फलित आणि भविष्य या विषयावर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात तीस उद्योजक कंपन्या आणि तीस सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या , रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, कार्यकारी संचालक डॉ जयंत कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. It is the responsibility of industries to support social work
ML/KA/PGB
13 Jan 2024