पावसामुळे मिळाले पिकांना जीवनदान
परभणी, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):तब्बल दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने खरिपाची पिके मरगळून जाऊन त्यांनी माना टाकल्या होत्या, सुगी शेतकऱ्यांच्या हातातून जाणार असल्याने शेतकरी हातबल झाले होते पण मागील दोन दिवसापासून परभणी जिल्ह्यात सर्व दूर पाऊस होत असल्याने कापूस, सोयाबीन ,ऊस, तूर पिकांना जीवदानी मिळाले आहे , तसेच गर्मीच्या उकाड्यापासूनही दिलासा मिळत आहे.
ML/KA/PGB 26 Sep 2023