मणिपूरच्या घटनेवरून विधिमंडळात गदारोळ, विरोधक आक्रमक

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मणिपूर च्या महिला बलात्कार आणि धिंड या घटनेवर सभागृहाने ठराव केला पाहिजे अशी मागणी आज काँग्रेसच्या सदस्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच आक्रमकपणे केली, विधान परिषदेतही विरोधक आक्रमक झाले होते.
विधानसभेत या मागणीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तुम्ही ठराव माझ्याकडे सादर करा मग निर्णय घेतो असं म्हटलं. मात्र काँग्रेस सदस्य जागा सोडून पुढे आले, त्यांनी घोषणाबाजी सुरू केली, या गदारोळातच प्रश्नोत्तरे सुरू झाली. इतर विरोधी पक्ष ही या मागणीत सामील झाला. आपण रीतसर ठराव द्या , सभागृहात गोंधळ करू नका असं पुन्हा अध्यक्षांनी सांगितलं मात्र काँग्रेसच्या महिला सदस्य आक्रमकच होत्या, अखेर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला
विधानपरिषदेतही आज माणिपूरच्या घटनेचे पडसाद उमटले. यावर चर्चा करावी अशी मागणी करत विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला.मात्र उपसभापती नीलम गोर्हे यांनी हा राजकीय वादविवादाचा विषय करु नये,असं आवाहन केलं.या प्रकरणाची दखल घेत केंद्रीय गृहमंत्र्यांना आपण पत्र लिहिल्याचं त्या म्हणाल्या.
पंतप्रधानांनी कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे,राज्यांनीदेखील कायदे कडक करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.आरोपींनाही अटक झाली आहे त्यामुळे राजकीय भांडवलासाठी विरोधकांनी गदारोळ करू नये, असं उपसभापतींनी यावेळी सांगितलं.त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला.
ML/KA/SL
21 July 2023