शासन आपल्या द्वारी योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ….

रत्नागिरी, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शासन आपल्या दारी या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरी येथे पार पडला. सुरुवातीला उपस्थित लाभार्थ्यांनी मोबाईलचे दिवे लावून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. योजनेचा शुभारंभ रिमोट द्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील ७५ हजार केंद्र आणि राज्य सरकारच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभ वाटप करण्यात आले. उद्योग मंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, मंत्री दादाजी भुसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात शासनाने घेतलेले निर्णय,योजनांचा लाभ याबाबत अधिक माहिती दिली. स्वराज्याचे सुराज्य व्हावं अस छत्रपतीनचे ध्येय होतं म्हणून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे असे ते म्हणाले.
35 कॅबिनेट बैठकीत जवळपास 350 निर्णय सर्वसामान्यांचे हिताचे घेतले आहेत. सर्वसामान्य माणसाचे जीवन बदललं पाहिजे,सुखाचे दिवस त्यांना आले पाहिजेत हा आमचा अजेंडा आहे.
गावकऱ्याने,भूमीपुत्राने योजनांसाठी चकरा मारत बसू नये म्हणून ही योजना आणली आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.The government launched the scheme through the hands of the Chief Minister…
ML/KA/PGB
25 May 2023