वादळी वाऱ्यासह गारपीटचा तडाखा; फळबागांसह,शेतीपिकाचे मोठे नुकसान

 वादळी वाऱ्यासह गारपीटचा तडाखा; फळबागांसह,शेतीपिकाचे मोठे नुकसान

बीड, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बीड जिल्ह्यातल्या धामणगांव परिसरात शनिवारी सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने शेती पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

आष्टी तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या दरम्यान धामणगांव कारखेल खुर्द, चिंचेवाडी, अरणविहरा, देवळगाव घाट, हरेवाडी, मराठवाडी ,शेडाळा, सावरगाव, गंगादेवी, वेलतुरी, तागडखेड, उंदरखेल, देवळाली पानाची, सुलेमान या परिसरामध्ये शेतकऱ्याची गारपिटीमुळे अतोनात नुकसान झालेली आहे.

वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतातील कांदा,मका यासह डाळिंब,संत्रा,शेवगा या फळबागाचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिसरातील पाहणी करून त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतक-यानी केली आहे.A burst of hail with gale force winds; Heavy damage to crops, including orchards

ML/KA/PGB
16 Apr 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *