पाणीपुरीतून झाली गावाला विषबाधा…

 पाणीपुरीतून झाली गावाला विषबाधा…

नांदेड , दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नांदेडच्या अर्धापुर तालुक्यातील चाभरा येथील ग्रामस्थांनी पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. ही घटना काळ घडली असून लहान बालकासह गावातील जवळपास 57 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले असून गावात एकच खळबळ उडाली आहे. गावात नेहमीच लावण्यात येणाऱ्या पाणीपुरीच्या ठेल्यावर पाणीपुरी खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व रुग्णांवर गावात उपचार करण्यात आले असून काही जणांना उपचारासाठी नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. गावात वैद्यकीय पथक पोहोचले असून सर्व बाधितांवर उपचार सुरू असून योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

ML/KA/PGB 16 APR 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *