साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने
वर्धा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने वर्धा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीमध्ये ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.
स्वावलंबी शिक्षण मंडळाचे पटांगण इथं साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून साहित्य नगरी सजली आहे. आज ग्रंथ दिंडीने संमेलनाला सुरवात करण्यात आली.यावेळी विदर्भ साहित्य सांघ्याचे अध्यक्ष यांनी ग्रंथ दिंडीची काढून सुरवात केली.
ग्रंथ दिंडी ला महात्मा गांधी पुतळ्याजवळून सुरवात करण्यात आली. शहरात मुख्य रस्त्याने रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, विविध देखावे या ठिकाणी पाहायला मिळत होते. विद्यार्थी , शिक्षक , अधिकारी, व जिल्ह्यातील साहित्य प्रेमी नागरिक या ग्रंथ दिंडीत सहभागी झाले होते
कुठून गेली दिंडी
या ग्रंथ दिंडीला महात्मा गांधी पुतळ्याजवळून सुरवात झाली ,नंतर शहरातील आंबेडकर चौक, शिवाजी पुतळा, पावडे नरसिंग होम रोड ते मुख्य संमेलन स्थळी ही ग्रंथ दिंडी नेण्यात आली.
ML/KA/SL
3 Feb. 2023