राहूल गांधी यांना लोक आता गांभीर्याने घेऊ लागले आहेत
कोल्हापूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद लोकांनी दिला, ते आता गांधी यांना गांभीर्याने घेऊ लागले आहेत असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.ते कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात राज्यात लोकसभेच्या चौतीस जागा महा विकास आघाडीला मिळतील असे म्हटले आहे,शिवाय राज्यातील सत्ताधाऱ्यांना अनुकूल वातावरण नाही हेच स्पष्ट झाल्याचे पवार म्हणाले. आतापर्यंत असे सर्वेक्षण अचूक ठरले आहेत, मी त्याला फार महत्त्व देत नाही पण सत्ताधाऱ्यांना अनुकूल वातावरण नाही हेच यातून स्पष्ट होते असे ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीतील समावेशा बाबत चर्चा झालेली नाही, प्रकाश आंबेडकर यांच्याशी कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही असे शरद पवार यावेळी म्हणाले.
ML/KA/SL
28 Jan. 2023