21 वर्षांनंतर भारताला मिळाला मिसेस वर्ल्ड बहुमान

 21 वर्षांनंतर भारताला मिळाला मिसेस वर्ल्ड बहुमान

न्यूयॉर्क, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथे झालेल्या मिसेस वर्ल्ड स्पर्धेत भारताच्या सरगम कौशल यांनी मिसेस वर्ल्ड  चा मुकुट जिंकला आहे. या स्पर्धेत जगभरातील 63 देशांतील महिलांनी भाग घेतला होता. पुरस्कारासाठी ज्युरी पॅनेलमध्ये अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय आणि मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश होता.

32 वर्षीय सरगम ​​कौशल यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. जम्मू-काश्मीरच्या रहिवासी असलेल्या सरगम व्यवसायाने शिक्षिका आहे. त्यांचे पती नौदल अधिकारी आहेत. सरगम यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील आणि पती यांना दिले आहे. यापूर्वी, सरगमने १५ जून २०२२ रोजी मिस इंडिया वर्ल्ड २०२२ चा पुरस्कार जिंकला होता.

या आधी तब्बल 21 वर्षांपूर्वी 2001 मध्ये भारताच्या  डॉ. अदिती गोवित्रीकर यांनी हा किताब जिंकला होता.

मिसेस वर्ल्ड स्पर्धेबद्द्ल  थोडेसे

  • ही जगातील  विवाहित महिलांसाठी आयोजित केली जाणारी पहिली सौंदर्य स्पर्धा आहे.
  • या स्पर्धेची सुरुवात  1984 मध्ये झाली.
  • पूर्वी स्पर्धेचे नाव मिसेस अमेरिका होते, जे नंतर मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड असे बदलले गेले.
  • 1988 मध्ये याला मिसेस वर्ल्ड असे नाव देण्यात आले.
  • श्रीलंकेची रोझी सेनायाके ही मिसेस वर्ल्ड बहुमान जिंकणारी पहिली महिला होती.

 

SL/KA/SL
19 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *