महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद उच्चस्तरीय समितीची पुनर्रचना

 महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद उच्चस्तरीय समितीची पुनर्रचना

मुंबई दि १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांच्या 14 सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आरोग्‍य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा यात समावेश आहे. समितीचे अध्यक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत. Reconstitution of High Level Committee on Maharashtra-Karnataka Border Dispute

यात इतर अकरा सदस्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील,सुरेश खाडे, दीपक केसरकर,शंभूराज देसाई, रविंद्र चव्हाण, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते यांचा समावेश आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी या उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. या समितीची बैठक येत्या सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.

या नव्या पूनर्गठीत समितीची ही पहिलीच बैठक होत असून कर्नाटकातील मराठी भाषिक हे या बैठकी कडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.

ML/KA/SL

19 Nov. 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *