mmcnews mmcnews

अर्थ

सरकारी तेल कंपन्यांना १२ हजार कोटींचा नफा

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंधनासाठी लागणारे खनिज तेल सरकारी महसूलाचे एक मोठे माध्यम आहे. दररोज ठरणाऱ्या या खनिजतेल दरावर देशाचे अर्थचक्र मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी सरलेल्या आर्थिक वर्षातील मार्च तिमाहीतअखेर १२ हजार ९८६.९ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा मिळवला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत कंपन्यांनी २१,३२०.०२ कोटी […]Read More

ट्रेण्डिंग

X प्लॅटफॉर्मवर लवकरच पाहता येणार चित्रपट

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नावीन्यपूर्णतेसाठी जगप्रसिद्ध असलेले Space X चे सीईओ एलॉन मस्क नुकतीच एक एक मोठी घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) युझर्स चित्रपट, टीव्ही मालिका आणि पॉडकॉस्ट पोस्ट करु शकतील. मोनेटायझेशनच्या (Monetization) माध्यमातून पैसा कमावू शकतील. एलॉन मस्क आणि त्याची बहिण टोस्का मस्क या दोघांमधील सोशल मीडियातील संवादातून ही […]Read More

महानगर

९.७५ कोटींचे अमली पदार्थ पोटात लपवणाऱ्या परदेशी व्यक्तीला अटक

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऐकावं ते नवलच, अशी घटना आज महानगरी मुंबईत समोर आली आहे. विमानतळावर अमली पदार्थांच्या तस्करीवरून कारवाई झाल्याच्या विविध घटना नेहमीच घडत असतात. सामानातून, कपड्यांमध्ये लपवून अशा प्रकारची तस्करी केली जाते. मात्र आज समोर आलेली घटना अचंबित करणारी आहे. हसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याच्या संशयावरून […]Read More

विदर्भ

अवकाळी पावसामुळे ऐन मे महिन्यात जंगल झाले हिरवे

यवतमाळ, दि.११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आहे. एप्रिल महिन्यापासून ते पाऊस पडेपर्यंत संपूर्ण जंगलातील झाडे सुकून जातात. आणि ते दृश्य कोणालाही नकोस होऊन जातं. परंतु गेल्या पंधरा दिवसात चार-पाच वेळा अवकाळी पाऊस पडला. परिणामी कधी नव्हे ते मे महिन्यामध्ये संपूर्ण जंगल हिरव कंच झालेल आहे . यामुळे वाटसरूंना दिलासा […]Read More

पर्यटन

सुट्टीची योजना आखत असाल तर एक उत्तम पर्याय, कच्छ

कच्छ, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  जर तुम्ही प्रियजनांसोबत डिसेंबरच्या सुट्टीची योजना आखत असाल तर कच्छ हा एक उत्तम पर्याय आहे. पांढर्‍या वाळवंटाचा विस्तीर्ण विस्तार अवास्तव दिसतो आणि ते भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक बनवते. किमान तापमान १०-१५ अंश सेल्सिअस आणि कमाल २५-३० अंश सेल्सिअस असते तेव्हा फेब्रुवारीमध्ये कच्छमध्ये चांगले हवामान असते. या काळात […]Read More

ट्रेण्डिंग

युगादी अर्थात ‘ अक्षय्य तृतीया ‘

मुंबई, दि. 10 (जाई वैशंपायन) : आज वैशाख शुद्ध तृतीया, म्हणजेच अक्षय्य तृतीया. भारतीय संस्कृतीत साडेतीन शुभमुहूर्त महत्त्वाचे मानले जातात. त्यापैकी अक्षय्य तृतीया हा साडेतिनावा म्हणजे अर्धा शुभमुहूर्त होय. चार युगांपैकी त्रेतायुगाची सुरुवात या दिवशी झाल्याचे मानले जाते, त्यामुळे या तिथीला ‘युगादी’ असेही म्हणतात. जसे विजयादशमीला शस्त्रपूजन, दीपावलीत दिवे, तसे आजच्या दिवशी ‘दान’ महत्त्वाचे असते. […]Read More

देश विदेश

प्रदीप शर्माला लखनभैया एन्काउंटर प्रकरणी जामीन मंजूर

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) याला सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. लखनभैय्या हत्या प्रकरणी प्रदीप शर्माला नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे. लखनभैय्या बनावट एन्काउंटरप्रकरणी त्यांना दोन महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात प्रदीप शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात दाद […]Read More

महाराष्ट्र

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उष्णतेच्या झळांनी होरपळणाऱ्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पूर्व मोसमी पावसाच्या सरींनी गारवा आणला आहे. पाऊस मुक्काम पुढचे दोन दिवस महाराष्ट्रात असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर या मुसळधार पावसाची जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात अनेक भागांमध्ये आज पाऊस पडत आहे. […]Read More

राजकीय

महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ब्रिजभूषण यांच्यावर आरोप निश्चित

नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. दिल्लीच्या राऊस महसूल न्यायालयाने आज हा निर्णय दिला. ब्रिजभूषण यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने त्यांच्यावर लैंगिक शोषण तसेच महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान केल्याचा आरोपही ठेवला आहे. […]Read More

देश विदेश

पाकने PoK मध्ये लावला कर्फ्यू

इस्लामाबाद, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून पाकीस्तानमधील सामान्य नागरिक भरडून निघत आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या सत्ता बदलानंतरही येथील परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. यामुळे त्रस्त झालेले सामान्य नागरिक आता रस्त्यावर उतरल आहेत. PoK (पाकव्याप्त काश्मीर) मध्ये वाढती महागाई आणि वीज कपातीविरोधात आज(10 मे) पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक […]Read More