सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली विरोधी पक्षांची याचिका

 सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली विरोधी पक्षांची याचिका

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण याचिका निकाली काढत मोदी सरकारला दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आज देशातील १४ विरोधी पक्षांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

केंद्र सरकारकडून ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना त्रास दिला जातोय, असा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. याविषयी ठराविक मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याची मागणी याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्यासह १४ पक्षांनी दाखल केलेली याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. विरोधकांसाठी ही मोठी चपराक समजली जात आहे.

कांग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, झारखंड मुक्ति मोर्चा, जनता दल यूनाइटेड, भारत राष्ट्र समिति, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, शिवसेना (उद्धव), नेशनल कॉन्फ्रेंस, नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी, सीपीआई, सीपीएम, डीएमके या 14 राजकीय पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर राजकीय पक्षांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडून युक्तीवाद केला. ईडी आणि सीबीआईच्या प्रकरणात देशात 6 पटीने वाढ झाली आहे. मात्र,फक्त 23% लोकांना शिक्षा झाली आहे. याद्वारे विरोधकांना त्रास दिला जातोय, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला.

कायद्याने कोणाला अटक करायची याची जबाबदारी एजन्सीकडे आहे. ही शक्ती त्यांना कायद्याने दिली आहे. आम्ही हे अधिकार काढून घेऊ शकत नाहीत. हे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *