सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला VVPAT व्हेरिफिकेशनवरील निर्णय

 सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला VVPAT  व्हेरिफिकेशनवरील निर्णय

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : EVM, VVPAT च्या मुद्द्यांवर आज झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. फक्त संशयाच्या आधारावर आम्ही आमचा निकाल जारी करु शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाची अथॉरिटी नाही. आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते ज्याची उत्तरं आम्हाला मिळाली आहेत. त्यामुळे निर्णय राखून ठेवला आहे.

26 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने 18 एप्रिल रोजी व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) सह ईव्हीएम वापरून केलेल्या मतांचे संपूर्ण क्रॉस-व्हेरिफिकेशन मागणाऱ्या याचिकांवर निकाल राखून ठेवला होता. यापूर्वी स्पष्टीकरण आवश्यक असल्याचे म्हटले होते. ईव्हीएम वापरलेल्या मतांचे संपूर्ण क्रॉस-व्हेरिफिकेशन मागणाऱ्या याचिकांच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला.

न्यायमूर्ती संजीव खन्ना म्हणाले की, आम्ही गुणवत्तेवर पुन्हा सुनावणी करत नाही. आम्हाला काही निश्चित स्पष्टीकरण हवे आहे. आम्हाला काही प्रश्न पडले आणि त्यांची उत्तरे मिळाली. निर्णय राखून ठेवत आहे. याप्रकरणी आज तब्बल 40 मिनिटे सुनावणी झाली. वास्तविक, या खटल्यात याचिकाकर्त्यांतर्फे प्रशांत भूषण, गोपाल शंकरनारायण आणि संजय हेगडे हे वकील बाजू मांडत आहेत. प्रशांत असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) चे आहेत. त्याचवेळी आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या वतीने अधिवक्ता मनिंदर सिंग, अधिकारी आणि केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपस्थित होते.

SL/ML/SL

24 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *