शाश्वत उत्पन्न देणाऱ्या बांबू लागवडीचा पर्याय स्वीकारणे आवश्यक : जयंत पाटील

 शाश्वत उत्पन्न देणाऱ्या बांबू लागवडीचा पर्याय स्वीकारणे आवश्यक : जयंत पाटील

सांगली, दि. 27  (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीसाठी इतर पिकांसह शाश्वत आणि उच्च उत्पन्न देणाऱ्या बांबू लागवडीचा अवलंब करावा लागेल. यासाठी कृषी, वनीकरण, सामाजिक वनीकरण यासह सर्व संबंधित यंत्रणा शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य व उत्तम मार्गदर्शन करतील, असे पालकमंत्री जयंत पाटील(Jayant Patil) यांनी सांगितले.

माणगंगा उद्योग समूह, आटपाडी यांच्या उपस्थितीत आटपाडीजवळील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय बांबू लागवड आणि बांबू अभियान कार्यशाळेत पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सदाशिवराव पाटील, पालकमंत्री जयंत पाटील,  जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत कार्शाळा पार पडली.

पालकमंत्री म्हणाले की, बांबूला 21 व्या शतकातील हिरवे सोने म्हटले जात आहे. सध्याच्या बाजारानुसार या उत्पादनाला जागेवर टनाला तीन ते साडेतीन हजार रुपये भाव मिळत आहे. एकदा लागवड केल्यावर 80 ते 100 वर्षे उत्पादन टिकवून ठेवता येते. बांबूपासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार केली जातात. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा या पिकाकडे कल नक्कीच वाढणार आहे.

बांबूच्या रूपाने चांगले पीक शेतकऱ्यांना उपलब्ध झाले आहे. सध्या बांबू लागवडीसाठी अनुदान केवळ दोन हेक्‍टर क्षेत्रावर लागवडीसाठी दिले जात असून, या भागातील कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

उप वनसंरक्षक विजय माने म्हणाले की, बांबू लागवडीमध्ये रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. बांबू लागवडीसाठी गावनिहाय बांबूच्या प्रजाती निवडता येतील. चार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात बांबूची लागवड(bamboo cultivation) करणाऱ्यांना 80 टक्के अनुदान आणि दर्जेदार रोपटे मिळणार आहेत असे ते म्हणाले.

 

HSR/KA/HSR/27 April  2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *