भारताने बांगलादेशला दिली 56 एकर जमीन

 भारताने बांगलादेशला दिली 56 एकर जमीन

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशच्या निर्मितीस सहाय्यभूत ठरलेल्या भारताशी बांगलादेशने सुरुवातीपासूनच सौहार्दपूर्ण संबंध ठेवले आहेत. भारत-आणि बांगलादेश यांच्यामध्ये ४०९६ किमी लांबीची आंतराष्ट्रीय सीमा रेषा आहे. आसाम, त्रिपूरा, मिझोरम, मेघालय आणि प.बंगाल या पाच राज्यांना बांगलादेशची सीमा लागून आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात ५० वर्षांनंतर जमिनीची देवाणघेवाण झाली आहे. बांगलादेशच्या लोकांनी याला ईद गिफ्ट म्हटले आहे. भारताने सीमावर्ती ठाकूरगावच्या राणीशंकोई उपजिल्हामधील 56.86 एकर जमीन बांगलादेशला दिली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही बांगलादेशकडून 14.68 एकर जमीन घेतली आहे.

भारताकडून बीएसएफ (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) आणि बांगलादेशकडून बीजीबी (बॉर्डर गार्ड बांगलादेश) यांच्यात ध्वज बैठकीत जमिनींची देवाणघेवाण झाली. 1974 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात जमिनीच्या देवाणघेवाणीचा करार झाला होता, मात्र राणीशंकोईबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही.

भारताकडून बांगलादेशला मिळालेल्या जमिनीला आता खस खत्यान (सरकारी जमीन) म्हटले जाईल. या जमिनीपैकी 48.12 एकर शेती, 6.87 एकर चहाच्या मळ्याखाली आणि 1.87 एकर जमीन लागवडीखाली आहे. बीजीबी कॅप्टन लेफ्टनंट कर्नल तंजीर अहमद म्हणतात की दोन्ही देशांमधील जमिनीची देवाणघेवाण सौहार्दपूर्ण पद्धतीने झाली आहे. आम्हाला ईदची भेट मिळाली. यासाठी आम्ही बीएसएफचे आभार मानतो. आत्तापर्यंत आम्ही भारताच्या या भागात आमच्या जमिनीबद्दल वडिलांकडून ऐकायचो, आता आम्ही तिथे जाऊन शेती करू शकणार आहोत.

बांगलादेशातील इतर 8 जिल्ह्यांमध्ये जमिनीच्या वितरणासाठी सर्वेक्षण प्रस्तावित आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये जमिनीचे वाटप होऊ शकेल. बीएसएफ, बीजीबीसह इतर एजन्सीही या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत. हे सर्वेक्षण वर्षअखेरीस पूर्ण होईल.

SL/ML/SL

13 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *