फडणवीसांनी पेन्शन योजनेबद्दल केले घूमजाव…
औरंगाबाद, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य सरकारी कर्मचारी , शिक्षक आदींना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पूर्णतः घूमजाव केले असून ही योजना लागू करण्यासाठी दीर्घ कालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
औरंगाबाद इथे शिक्षक मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी घेतलेल्या प्रचारसभेत ते आज बोलत होते. हिवाळी अधिवेशनात त्यांनी कोणत्याही परिस्थितीत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार नाही असे ठामपणे विधानसभेत जाहीर केले होते. या योजनेमुळे एक लाख दहा हजार कोटींचा बोजा सरकारवर पडून सरकारचे कंबरडे मोडेल असेही सांगितले होते.Fadnavis talked about the pension scheme…
मात्र शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत आपले हे वक्तव्य तापदायक ठरू शकते हे लक्षात येताच आधी मुख्यमंत्र्यानी ठाण्यात आणि आता फडणवीसांनी औरंगाबादेत यावर नकारात्मक भूमिका नसल्याचे स्पष्ट करीत सपशेल घूमजाव केले आहे.
ही योजना लागू करण्याची ताकद फक्त आमच्याकडेच आहे, इतर फक्त वल्गना करणारे आहेत असेही फडणवीस आज म्हणाले. फक्त ही योजना लागू करण्यासाठी दीर्घ कालीन उपाययोजना कराव्या लागतील असे सांगत त्यांनी शिक्षकांना चुचकारले आहे.
यासोबतच येत्या तीन महिन्यांत तीस हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे, गेली दहा वर्षे ती बंद होती असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
ML/KA/PGB
25 Jan. 2023