पहलगाम हल्ल्याबाबत पार पडली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंगळवारी (दि. २२) रोजी काश्मिरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर काल दिवसभर वेगवान घडामोडी घडल्या. काल सकाळी गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनतर संध्याकाळी पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक कॅबिनेट कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर आज संध्याकाळी हल्ल्याबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. दोन तास चाललेल्या या बैठकीत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही खासदार उपस्थित नसल्याची माहिती मिळत आहे.