BTS च्या वेडामुळे तीन शाळकरी मुलींनी रचला कोरियाला जाण्याचा डाव

 BTS च्या वेडामुळे तीन शाळकरी मुलींनी रचला कोरियाला जाण्याचा डाव

धाराशीव, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकप्रिय कोरियन बँड BTS ने भारतीय Gen-Z ना अक्षरश: वेड लावले आहे. शाळकरी मुले मुली याच्या नादाने बेभान झाली आहेत. याच नादा आज धाराशीवहून थेट कोरिया गाठण्यास निघालेल्या दोन शाळकरी मुलींचा प्लॅन आज उघडकीस आला आहे. धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील तीन शाळकरी मुलींनी कोरियन डान्सर ग्रुप बीटीएसला भेटण्यासाठी चक्क स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला आहे. तिन्ही मुलींनी पुण्याला जाऊन पैसे कमवायचे आणि तिथून कोरियाला जायचं असा प्लॅन केला होता. मात्र अवघ्या अर्ध्या तासांत त्यांचं बिंग फुटलं आहे. पोलिसांनी तिघींना ताब्यात घेतलं आहे. त्यांचं समुपदेशन केलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमरग्याच्या निळू नगर तांड्यावरील तीन मुलींनी कोरियन डान्स ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी आपल्याच अपहरणाचा कट रचला होता. मात्र अवघ्या 30 मिनिटांत पोलिसांनी तो कट उधळून लावला असून तिन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतलं आहे. उमरग्यातून पुण्याला जायचं, तिथे जाऊन पैसे कमवायचे आणि कोरियाला जायचं, असा कट मुलींनी रचला होता. त्या धाराशिवमधून थेट पुण्याच्या दिशेने निघाल्या देखील होत्या.

मात्र धाराशिव पोलिसांच्या दक्षतेमुळे अवघ्या 30 मिनिटात 3 अल्पवयीन मुलींच्या बनावट अपहरणाचा बनाव उघड झाला आहे. मुलींनी सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथून स्वतः वडिलांना फोन करून अपहरण केल्याची माहिती दिली. त्यानंतर मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी मुलींना गाठलं. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून मुलींना ताब्यात घेवून पालकांच्या स्वाधीन केलं.

SL/ML/SL

30 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *