राज्यात तिसऱ्या टप्प्यात सायं. ६ वाजेपर्यंत अंदाजे ६१.४४ टक्के मतदान

 राज्यात तिसऱ्या टप्प्यात सायं. ६ वाजेपर्यंत अंदाजे ६१.४४ टक्के मतदान

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून अकरा मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

रायगड – ५८.१० टक्के
बारामती – ५६.०७ टक्के
उस्मानाबाद – ६०.९१ टक्के
लातूर – ६०.१८ टक्के
सोलापूर – ५७.६१ टक्के
माढा – ६२.१७ टक्के
सांगली – ६०.९५ टक्के
सातारा – ६३.०५ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५९.२३ टक्के
कोल्हापूर – ७०.३५ टक्के
हातकणंगले – ६८.०७ टक्के

ML/ML/SL

8 may 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *