३२ टक्के मुंबईकर निद्रानाशाने त्रस्त

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकीकडे अब्जाधीशांची संख्या वाढत चाललेल्या महानगरी मुंबईला लाईफस्टाईल मुळे होणाऱ्या आजारांनी ग्रासले आहे. २४ तास धावणाऱ्या या महानगरातील ३२ टक्के लोक निद्रानाशाने त्रस्त असल्याची गंभीर बाब आता एका सर्वेक्षणात समोर आली आहे.
वेकफिट.को (Wakefit.co) या भारतातील सर्वात मोठ्या डी२सी स्लीप व होम सोल्यूशन्स प्रदात्याने नुकतेच त्यांच्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड (जीआयएसएस) २०२४चा ७वा अहवाला सादर केला आहे. यंदाच्या सर्वेक्षणामधून मुंबईतील झोपेचे ट्रेण्ड्स व पद्धतींबाबत नवीन माहिती निदर्शनास आली. या अहवालामधील निष्कर्षानुसार, जवळपास पन्नास टक्के मुंबईकर रात्री ११ नंतर झोपतात. तसेच मुंबईतील ५५ टक्के व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर रिफ्रेश वाटत नाही. ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या ४९ टक्क्यांच्या तुलनेत वाढ झाली आहे. या अहवालामधील अतिरिक्त माहिती पुढे देण्यात आली आहे.
या अहवालामधून निदर्शनास आले की, मुंबईतील ४६ टक्के व्यक्ती रात्री ११ नंतर झोपतात, ज्यामधून रात्री उशिरापर्यंत केल्या जाणाऱ्या क्रियाकलापांचा प्रचलित ट्रेण्ड दिसून येतो. मुंबईतील रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याच्या प्रमाणामधून ५५ टक्के व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर रिफ्रेश न वाटण्याचे दिसून येते. या अहवालामधून निदर्शनास आले की, ८९ टक्के मुंबईकर रात्रीच्या वेळी १ ते २ वेळा उठतात. झोपेचा दर्जा खालावत जाण्याच्या लक्षणांमूधन ३२ टक्के मुंबईकरांनी झोपेचा आजार झाल्याचे सांगितले आहे.
SL/ML/SL
27 March 2024