साहित्य संमेलनात लोककला जपण्यासाठी विशेष कार्यक्रम

जळगाव, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील अंमळनेर येथे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून आज दुसऱ्या दिवशी खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची मुलाखत आयोजित करण्यात आले होती तसेच आजच्या मराठी साहित्यातून जीवनमूल्य हरवत चालली आहेत का?, अलक्षित साने गुरुजी, आंतरभारती काल आज उद्या या विषयांवर परिसंवादचे आयोजन आणि आठवणीतल्या कविता हा सुरेख कवितांचा रसास्वाद कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांमध्ये खानदेशातील लोककला या सर्वांना माहीत व्हाव्या आणि त्या जपण्यासाठी प्रयत्न व्हावे यासाठी लोककलांचे सादरीकरण हा विशेष कार्यक्रम देखील घेण्यात आला या खानदेशातील प्रसिद्ध लोककलावंतांनी त्यांच्या कला सादर करत रसिकांचे मनोरंजन केले.
ML/KA/SL
3 Feb. 2024