मातंग समाजाने अजून किती वर्ष आंदोलन करायचे

 मातंग समाजाने अजून किती वर्ष आंदोलन करायचे

मुंबई दि. १६ ( एम एमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या ४० वर्षापासून मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या सरकारने अद्याप निकाली काढल्या नाहीत. वेळोवेळी उपोषण,आंदोलन करत सरकारचे आश्वासन घेत आंदोलन थांबवायचे. असे किती वर्ष चालणार ? असा सवाल मातंग क्रांती महामोर्चाच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

राज्यातील २४ लाख मातंग समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जतनिहाय जनगणना केली जावी , आण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था ( आर्टी) स्थापन झाली पाहिजे , ५९ जाती मधील १३ टक्के आरक्षण पैकी ८ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. या मागण्यासाठी प्राणत्याग उपोषण करण्यात येणार असल्याचे विकास तांबे यांनी सांगितले.यावेळी सुनीता तुपसौंदर्य , अशोक ससाणे , मोहन राव ,श्यामराव सकट, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

SW/KA/SL

16 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *