राज्यात गुलाबी थंडी गायब, उष्णतेत वाढ

 राज्यात गुलाबी थंडी गायब, उष्णतेत वाढ

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गेल्या आठवड्यात पडलेल्या तुरळक पावसामुळे राज्यात थंडीचा गारवा गायब झाला असून कडाक्याचे ऊन पडत आहे. काही शहरांतील तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपच्या वर पाेहचला आहे. ऐरव्ही जी जानेवारीत महिन्यात गुलाबी थंडी लागत होती ती थंडी आता कुठेतरी गायब झाली. त्यामुळे वातावरणात सध्या माेठे बदल पहायला मिळत आहे.

राज्यात ऑक्टाेबर नंतर पाऊस ओसरल्यावर थंडीचा हंगाम सुरु हाेत असतो. नोव्हेंबर असाच उष्णतेत गेला पण डिसेंबर महिन्यात काही दिवस थंडीचा आस्वाद लोकांना घ्यायला मिळाला. पण आता जानेवारी सुरु हाेताच पुन्हा उष्णतेचा पारा वाढला आहे. त्यामुळे पूर्वी लाेकांना जो थंडीचा आस्वाद मिळत होता तो आता नाहीसा झाला आहे. राजधानी पणजीत उष्णतेचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या वर जात आहे. तसेच इतर शहरांचा पाराही वाढत आहे. रात्रीच्यावेळीही जास्त थंडी नसते. वातावरणात दमट तसेच धव पडत असल्याने थंडी लागत नाही. Disappearing pink cold

ML/KA/PGB
13 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *