भारतीय संघ विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत

अंताल्या, तुर्की, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिकर्व्ह संघाने ९ वर्षांनंतर विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. आता भारताच्या रिकर्व्ह पुरुष संघाला सुवर्णपदकाचे लक्ष्य भेदण्याची संधी आहे. अतानू दास, बी. धीरज आणि तरुणदीप रॉयने भारतीय संघाला हे मोठे यश मिळवून दिले आहे.
भारताने काल पहिल्या स्टेजवर सलग तीन विजय संपादन केले आहेत. आता भारताची सुवर्णपदकासाठीची लढत चीनविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. त्यानंतर भारताने दुसऱ्या फेरीत १३ व्या मानांकित जपानचा पराभव केला. भारताने ५-४ ने सामना जिंकला. त्यानंतर भारताने पुढच्या फेरीत चौथ्या मानांकित तैवान आणि हाॅलंडवर सहज मात केली.
23 एप्रिल रोजी (रविवार) चीनवर मात करण्यास सज्ज होईल.. संघाचे नेतृत्व अतनु दास करत आहे आणि त्यात धीरज बोम्माडेवेरा आणि तरुणदीप राय सारखे खेळाडू आहेत. या संघाने उपांत्य फेरीत नेदरलँड्सचा ६-२ अशा फरकाने पराभव केला. 32 च्या फेरीत, स्टेज 1 च्या शेवटी रिकर्व्ह सांघिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला बाय मिळाला. भारताने प्री-क्वार्टर फायनल सामन्यात 13व्या मानांकित जपानचा शूट-ऑफमध्ये 5-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत 12व्या मानांकित चायनीज तैपेईचा सामना केला आणि सामना 6-2 असा जिंकला. भारतीय संघ रविवारी सुवर्णपदकासाठी महत्त्वाचा सामना खेळणार आहे.
SL/KA/SL
21 April 2023