उजनी धरणाचा कालवा फुटला ,शेतीचे नुकसान
सोलापूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोलापूर जिल्ह्याची वरदान असणाऱ्या उजनी धरणाचा कालवा फुटल्याने शेकडो एकर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील मोहोळ तालुका येथील फाटा क्रमांक 14 च्या पाटकुल जवळील कालवा फुटला.
अचानक कालवा फुटल्याने कालव्यातील पाणी मोठ्या प्रमाणावर शेतीत घुसले आहेत. 25 जानेवारीपासून शेतीसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या कालवा हा पूर्ण क्षमतेने वाहत होता. शेतीत पाणी उभारल्यामुळे गहू हरभरा द्राक्ष केळी अशा पिकांचे नुकसान झाले आहे.
ML/KA/PGB
29 Jan. 2023