ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागाने तोडली पपईची बाग

 ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागाने तोडली पपईची बाग

औरंगाबाद, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क):  औरंगाबाद जिल्ह्यातील करोडी येथे ग्राम पंचायत निवडणूकीत एका शेतकऱ्याची सूनबाई निवडून आल्याने अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्यांची 350 पपईच्या झाडांची बाग तोडल्याची घटना घडली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील करोडी येथे गट नंबर 85 मध्ये रामभाऊ दवंडे यांची शेती आहे . काल परवालाच ग्रामपंचायतीचे निकाल लागले या निवडणुकीत रामभाऊ दवंडे या शेतकऱ्याच्या सूनबाई निवडून आल्या होत्या, निवडणुकीचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी अज्ञाताने रामभाऊ धोंडीबा दवंडे यांच्या शेतातील पपईचे 350 झाडे तोडली.

ही धक्कादायक घटना शेतकरी आज शेतामध्ये गेल्याने निदर्शनात आली असून अज्ञाता विरुद्ध दौलताबाद पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

ML/KA/SL

23 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *