विमानसेवा आणि कारखान्याची चिमणी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा

 विमानसेवा आणि कारखान्याची चिमणी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा

सोलापूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी वाचवण्यासाठी आणि बोरामणी याठिकाणी विमानतळ होण्यासाठी आज शेतकरी रस्त्यावर उतरले होते. Farmers march to save airlines Services and factories – Boramani Solapur District

शेतकऱ्यांनी सिद्धेश्वर कारखान्यापासून होम मैदानापर्यंत विराट मोर्चा काढला. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सभासद उपस्थित होते. केंद्र सरकारच्या उडान योजनेमध्ये सोलापूरचा समावेश आहे. मात्र सध्याच्या सोलापूरच्या होटगी विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्यास सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा होत असल्याने बोरामणी याठिकाणी नवीन विमानतळ सुरू करावे. अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तर सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी वाचवून सर्व सभासदांचा कारखाना टिकवण्यासाठी शेतकरी आग्रही झाले आहेत.

ML/KA/SL
19 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *