उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज वैध

 उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे 2024 रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल झाले होते. काल या अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण 301 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघात 22, दिंडोरी – 15 , नाशिक – 36, पालघर – 13, भिवंडी – 36, कल्याण – 30, ठाणे – 25, मुंबई उत्तर – 21, मुंबई उत्तर पश्चिम – 23, मुंबई उत्तर पूर्व – 20 ,मुंबई उत्तर मध्य – 28, मुंबई दक्षिण मध्य – 15, आणि मुंबई दक्षिण – 17 असे एकूण 301 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

ML/ML/PGB 5 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *