महाराष्ट्रातील पार्सल केंद्राने परत मागवावे
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वृद्धाश्रमात कुठेही जागा न मिळालेले हे महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून पाठवलेले पार्सल केंद्राने परत मागवावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा शिवसेना ( ऊबाठा ) प्रमुख उध्दव ठाकरे Chief Uddhav Thackeray यांनी दिला आहे.Thackeray also said.
आज सायंकाळी प्रसार माध्यमांशी केलेल्या संवादात त्यांनी हा इशारा दिला. शिवाजी महाराज आणि अन्य मोठ्या व्यक्तीबद्दल राज्यपाल भगतसिंग कोशियारी हे नेहमी उलटसुलट वक्तव्य करीत असतात , राज्यातील महाराष्ट्र प्रेमी जनता आता हे सहन करणार नाही असे ठाकरे म्हणाले.
राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत असतात त्यांनी अशी वक्तव्ये करू नयेत, निःपक्षपाती असले पाहिजे , मात्र आता सर्व महाराष्ट्र प्रेमींनी पक्ष भेद विसरून एकत्र यावे आणि आंदोलने करावीत अशी आपली अपेक्षा आहे असेही ठाकरे यांनी सांगितले.
ML/KA/PGB
24 Nov .2022