ई-वाहन चार्जिंगसाठी Tata Power ने उभारले १० कोटी किलोमीटरचे जाळे

 ई-वाहन चार्जिंगसाठी Tata Power ने उभारले १० कोटी किलोमीटरचे जाळे

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येता काळ हा ई-वाहनांचा असणार आहे. भारतीय ग्राहक दुचाकी आणि चार चाकी E-VEHICLES ना मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत आहेत. ऑटोमोबाईल कंपन्याही वाहन निर्मितीमध्ये अद्ययावत सुधारणा करत नवनवीन मॉडेल्स डेव्हलप करत आहेत. यामुळे वायू आणि ध्वनी प्रदुषणावर नियंत्रण मिळवता येणार आहे. याचा साकल्याने विचार करून सन २०३०पर्यंत देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व वाहने विद्युत बॅटरीआधारित (ई-वाहन) व्हावीत, तसेच खासगी उपयोगातील किमान निम्मी वाहने बॅटरीआधारित असावीत आणि एकूण वाहन विक्रीपैकी ३० टक्के वाहने ‘ई’ श्रेणीतील असावीत, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. याअंतर्गत २०३०पर्यंत वार्षिक एक कोटी ई-वाहन विक्रीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. याअंतर्गत टाटा पॉवरने ई-वाहन चार्जिंग सुविधेच्या दृष्टीने १० कोटी किलोमीटरचे जाळे देशभरात उभे केले आहे.

टाटा पॉवरकडून मुंबईतील साडेसात लाखांहून अधिक ग्राहकांना दररोज सरासरी ८०० मेगावॉट विजेचा पुरवठा होतो. तसेच ओडिशा व दिल्लीतदेखील कंपनी विजेचे वितरण करते. या वितरणला ई-चार्जिंगची जोड देण्यासाठी कंपनीने त्यासंबंधीचे जाळे उभे करण्यास सुरुवात केली आहे.याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात ८६ हजारहून अधिक गृहचार्जर वितरित केले आहेत. पाच हजार ३००हून अधिक सार्वजनिक, निम-सरकारी आणि फ्लीट चार्जिंग पॉइंट देशभरात आहेत.

हे ई-वाहन जाळे ५३० शहरांमध्ये आहेत. याठिकाणी ८५०हून अधिक बस चार्जिंग स्थानकांचादेखील समावेश आहे. वाहनचालकांच्या सुविधेसाठी हे चार्जर महामार्ग, हॉटेल, मॉल, रुग्णालये, कार्यालये, गृहसंकुले आदी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या ठिकाणी हे चार्जर बसवण्यात आले आहेत.

SL/ML/SL

17 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *