सावरकरांवरील वक्तव्य , राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

प्रतिनिधी
नवी दिल्ली, 25 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधाणावर तीव्र नाराजी व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना ताकिद दिली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सावरकर यांनी आयुष्य पणाला लावले हे आपण विसरता कामा नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लखनौ न्यायालयाने बजावलेल्या समन्सला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूती मनमोहन यांच्या खंडपीठाने लखनौ न्यायालयाच्या समन्सला स्थगिती दिली. सोबतच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत पुन्हा आक्षेपार्ह विधान न करण्याची स्पष्ट ताकिदही राहुल गांधी यांनी दिली. त्यांनी पुन्हा असे विधाण केले तर न्यायालय स्वत:हून त्याची दखल घेत कारवाई करेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. राहुल गांधी यांनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘भारत जोडा यात्रा’ दरम्यान महाराष्ट्रातील एका रॅलीत सावरकर यांच्याविरोधात विधाण केले होते.
सुनावणी करतनाा न्यायालयाने म्हटले की, वीर सावरकर यांच्यासारख्या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे आणि आपण त्यांच्याबाबत अशाप्रकारचे विधाण करणे योग्य नाही. महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांशी लेखी संवाद साधताना पत्रात स्वत:चा उल्लेख “तुमचा विश्वासू सेवक” असा केला आहे, ही बाब राहुल गांधी यांना माहित आहे काय? असा प्रश्न न्यायालयाने राहुल गांधी यांचे वकिल मनू अभिषेक सिंघवी यांना विचारला.
हे संपूर्ण प्रकरण २०२२ मधील आहे. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान महाराष्ट्रातील अकोला येथे एक सभा घेतली होती. यामध्ये त्यांनी वीर सावरकरांवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. सावरकर यांनी आपण आयुष्यभर इंग्रजांचे गुलाम राहू, असे सावरकर यांनी लिहून दिले होते, असे राहुल गांधी सभेत म्हणाले होते. त्यांनी भीतीपोटी माफीही मागितली. गांधी-नेहरूंनी हे केले नाही, म्हणून ते वर्षानुवर्षे तुरुंगात राहिले. या प्रकरणी एका वकिलाने राहुल गांधींविरुद्ध खटला दाखल केला होता.