सातपुड्यातील चिंचपाणी धरण ‘ओव्हरफ्लो’!

 सातपुड्यातील चिंचपाणी धरण ‘ओव्हरफ्लो’!

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील चार वर्षांपासून पावसाळा निराशाजनक झाल्याने या धरणात पुरेसा जलसाठा झालेला नव्हता. परिसरात त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली होती. पावसाअभावी धानोरा व परिसरातील पाण्याची पातळीदेखील चांगलीच खालावली होती. पाण्याचा प्रश्न फारच गंभीर होत चालला होता. अशातच यावर्षी निसर्गाने बऱ्यापैकी पाउस करून जेमतेम धरणात जलसाठा भरण्यात सुरुवात झाली. सातपुडा पर्वतातून धबधब्याप्रमाणे येत असलेल्या पाण्याच्या धारेने धरणात पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले आहे.सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या या धरणामुळे त्याच्या चारही बाजूला हिरवेगार रान दिसते, तर धरणाच्या वरच्या बाजूला सातपुडाच्या पर्वत रांगा असल्याने त्याचे सौंदर्य निसर्गप्रेमींच्या नजरेत आणखीनच खुणावत आहे. परिसरातून नागरिक, निसर्गप्रेमी या ठिकाणी सुटीचा आनद घेण्यासाठी येत आहेत, तर काही तरुण या ठिकाणी मेजवानीचा आस्वाद घेतानाही दिसून येत आहेत. बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील धानोरा गावाच्या उत्तरेला आठ किलोमीटर अंतरावर असलेले चिंचपाणी धरणावर जाण्यासाठी रस्ता थेट धारणापर्यंत सुस्थितीत असल्याने दूरदुरून पर्यटक निसर्गाचा मनसोक्तपणे आनंद लुटण्यासाठी येथे गर्दी करीत आहेत.

PGB/ML/PGB
20 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *