नदीपात्र प्रदूषित , हजारो मासे मृत्युमखी….
कोल्हापूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगेबरोबर वारणाही प्रदूषणाच्या विळख्यात पडली असून राजाराम बंधाऱ्यापासून इचलकरंजी शिरोळ पर्यंत आणि वारणा नदी पात्रातही हजारो मृत माशांचा खच पडलेला दिसत आहे.River bed polluted, thousands of fish dying….
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी पात्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून हजारो मृत मासे तरंगताना आढळत आहेत.पंचगंगा नदीच्या दूषित पाण्याची तीव्रता वाढल्यानं कोल्हापूर पाठोपाठ शिरोळ तालुक्यातील तेरवाड इथल्या पंचगंगा नदी पात्रातही हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत.
हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या वारणा नदी पात्रातही मळीयुक्त पाणी सोडल्यानं दुर्गंधी येत असून हजारो मासे मृत होऊन नदीकाठाला तरंगत आहेत.
वारणा पट्ट्यात पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रमुख स्त्रोत असलेल्या वारणा नदी पात्रात रसायनुक्त पाणी अथवा दूषित पाणी सोडण्याच्या वारंवार घटना घडत आहेत. यामुळे लाखो जलप्राण्यांना जीवनास मुकावं लागत आहे.
शिये परिसर, राजाराम बंधारा आणि वळीवडे- गांधीनगर इथल्या नदीपात्रापासून इचलकरंजीपर्यंत मृत माशांचे खच आढळून आले आहेत.
मृत माशांचे खच आढळल्याने नदी प्रदूषणाला या परिसरातील कारखानेच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष पर्यावरण अभ्यासकांनी काढला आहे.
या प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थानाही जबाबदार धरण्याची मागणी करण्यात आली आहे.
ML/KA/PGB
10 Jan. 2023