दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जनआक्रोश मोर्चा

 दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जनआक्रोश मोर्चा

बीड, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईत जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली ,मुख्य मार्गाने हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात असलेली बैलगाडी मोर्चाचे आकर्षण ठरली.

दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना सरसकट 1 लाख रूपये मदत करावी,100 टक्के पीक विमा मंजूर करावा, 25 टक्के जोखीम अग्रीम देण्यात यावे, विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक शुल्क आणि शेतकर्‍यांचे वीज बील माफ करावे, जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून जनावरांना चारा , जनतेला मोफत स्वस्त धान्य उपलब्ध करावे, एम.आर.ई.जी.एस.(रोहयो) अंतर्गत कामे सुरू करण्यात यावीत यासह विविध मागण्यांसाठी यावेळी जन आक्रोश करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज साठे, बबन गित्ते यांच्यासह मोठी उपस्थिती होती.

ML/KA/SL

5 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *