लग्नाच्या जेवणातून विषबाधा; ३४ महिलांवर उपचार सुरू
बीड दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लग्नकार्य असल्यामुळे सुवासिनी महिलांना जेवण देण्याची प्रथा काही भागांमध्ये आहे. बीड जिल्ह्यातल्या गित्ता या गावी सुवासिनी महिलांना जेवण देण्यात आले मात्र या जेवणातून हळूहळू 50 ते 60 लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. Poisoning from the wedding meal; Beed Maharashtra
अंबाजोगाई तालुक्यातील मौजे गित्ता येथे शिंदे परिवाराचे लग्न 9 डिसेंबर रोजी आहे. त्यानिमित्त विवाहित महिलांना (सुवासीनींना )जेवण सोमवार दुपारी ठेवण्यात आले होते. शिंदे परिवारांचे भावकी मोठी असल्याने व शुभ कार्यानिमित्त महिलांना सुवासिनीचे जेवण असल्यामुळे शेकडो लोक पुरणपोळीच्या या जेवनामध्ये सहभागी झाले.
मात्र जेवणाच्या कुठल्यातरी पदार्थामुळे हळूहळू सोमवार पासून काही लोकांना अस्वस्थ वाटू लागले व आज मंगळवार दुपारपासून काही लोकांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. काही लोकांना अशक्त वाटू लागले त्यामुळे या सर्व लोकांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सध्या एकूण 34 महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील उपचार घेत आहेत या जेवणातून नवरदेवालाही विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे.
ML/KA/SL
7 Dec. 2022