न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला वाढीव मतदानाचे पुरावे सादर करण्याची नोटीस

 न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला वाढीव मतदानाचे पुरावे सादर करण्याची नोटीस

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणूकीनंतर विरोधी पक्षांकडून निकालाबाबत आणि निवडणूक प्रक्रियेबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याच संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूण आदेश दिला आहे. विधानसभा निवडणुकीत सायंकाळी ६ नंतर झालेल्या मतदानाच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला नोटीस दिली. सायंकाळी ६ नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ देण्याचे आदेश या नोटीसमध्ये दिले आहे. तसेच या नोटीसला दोन आठवड्यात उत्तर द्यावे, असेही मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे.

मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संध्याकाळी सहा वाजल्यानंतर ७६ लाख मतदान झाल्याचे दिसत आहे. जर एवढे मतदान झाले असेल तर संध्याकाळनंतर प्रत्येक बुथवर किती मतदारांना टोकन वाटले याची आकडेवारी आणि व्हिडीओ क्लीप द्या, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांच्यासह विरोधी पक्षाने केली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आली.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीज बजावल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शेवटच्या तासात वाढलेले मतदान हा घोटाळा असल्याची टीका करत सरकारवर हल्ला चढवला. विधानसभेच्या निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान कसे? निवडणूक आयोग म्हणते हे शक्य आहे, अरे कसे शक्य आहे? 76 लाख? साधारण दीडशे मतदारसंघात तर जवळपास 20 ते 25 हजार मतदार वाढवले आहेत. आणि प्रत्येक बूथ वर शंभर ते दीडशे मत वाढवले, असा दावा संजय राऊत यांनी केला. या घोळातून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सरकार स्थापन झाले. असे संजय राऊत म्हणाले.

SL/ML/SL

3 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *