जत तालुका पाणी संघर्ष समिती करणार शिंदे गटात प्रवेश
सांगली, दि 13 : (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगलीच्या जत तालुक्यातील सीमा भागातील गावांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी निकाली काढत तब्बल दोन हजार कोटी जाहीर केले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार माणण्यासाठी सांगलीच्या सीमाभागातील पाणी संघर्ष समिती कार्यकर्ते मुंबई मध्ये जाऊन सीमाभागातील नागरिकांकडून मुख्यमंत्र्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.
या कामाचे टेंडर लवकर काढावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी 16 तारखेला टेंडर निघेल असे आश्वासन दिले तसेच टेंडर 16 तारखेला निघाले की आम्ही सर्व संघर्ष समिती पदाधिकारी कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात जाहिर प्रवेश करणार असल्याचे पाणी संघर्ष समिती चे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी आपल्या आभाराच्या भाषणात स्पष्ट केले.
ML/KA/SL
13 Jan. 2023