विद्यार्थ्यांनी एका दिवसात लिहिली भारतीय राज्य घटना

 विद्यार्थ्यांनी एका दिवसात लिहिली भारतीय राज्य घटना

छत्रपती संभाजीनगर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त निमित्ताने ज्ञानेश विद्या मंदिर , हेरंब विद्या मंदिर व स्व् यम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी एका दिवसात भारतीय राज्य घटनेची एकूण 395 कलमे आणि 22 भाग मराठी , इंग्रजी भाषांमध्ये लिहले असून हा नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे.

सकाळी सात ते नऊ वाजे पर्यंत भारतीय घटनेची कलमे आणि भाग मराठी तसेच इंग्रजी भाषांमध्ये लिहून विक्रम प्रस्थापित केला आहे.

या विक्रमाचे प्रमाणपत्र संस्थेस केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार वितरण करण्यात आले आहे. यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड चे पवन सोलंकी, संस्थेचे शैलेंद्र विठोरे, मीनाक्षी विठोरे आदी सह इतर मान्यवरांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

ML/KA/SL

7 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *