शिमग्यापर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करा अन्यथा.!
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वेळ पडली तर नागपूर ते मुंबई समृद्धी मार्गाचे उर्वरित बांधकाम थांबवा व मुंबई गोवा महामार्गाचे काम शिमग्यापर्यंत पूर्ण करा अशी मागणी मुंबई गोवा महामार्ग समितीच्या वतीने मुंबई पत्रकार संघात करण्यात आली . अन्यथा कोकणवासीयांच्या रोषाला राजकारण्यांना सामोरे जावे लागेल असाही इशारा यावेळी देण्यात आलाComplete the work of Mumbai Goa highway till Shimgya otherwise.!
मुंबई गोवा महामार्ग हा कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे . पाच वर्षांपूर्वी बांधकामास सुरु झालेला समृद्धी महामार्ग काल सुरु झाला मात्र मृत्यूचा सापळा बनलेला व गेली १२ वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग हा राजकारण्यांमुळे रखडला आहे . असा आरोपही यावेळी करण्यात आला . ज्या कोकणाने महाराष्ट्राच्या तिजोरीला कोकणाचा राजा हापूस आंबाच्या रूपाने आर्थिक बाळ दिले त्या कोकणाचा विकास करण्याचा राजकीय पक्षांना विसर पडला आहे . प्रत्येक राजकीय पक्षाला आता १२ वर्षांचा हिशोब हा द्यावाच लागेल . म्हणून गेल्या १२ वर्षात ज्या ज्या राजकीय पक्षांचे खासदार , आमदार , मंत्री , विधानससभा सदस्य कोकणातून झाले व आहेत त्यांनी मुंबई महामार्ग पूर्ण करण्यासाठी काय काय केले ते निधड्या छ्त्तीने व्यासपीठावर येऊन सांगावे . आजपर्यंत २००० हुन जास्त निष्पाप कोकणी माणसांचे बळी मुंबई गोवा महामार्गाच्या दिरंगाईत गेले . व त्याहीपेक्षा जास्त जायबंदी झाले . या सर्व निष्पाप कोकणवासीयांच्या वारसांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे नोकरी व आर्थिक मदत जाहीर करावी व हि एकतर मदत ठेकेदारानाकडून किंवा त्या भागातील लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतून देण्यात यावी अशी मागणी या वेळी करण्यात आली .हा विषय अत्यंत ज्वलंत झाला असून यापुढे दुर्लक्ष झाल्यास गेल्या १२ वर्षातील सर्व लोकप्रतिनिधी त्या काळातील प्रशासकीय अधिकारी , मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , केंद्रीय मंत्री यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्याची तयारी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही केलेली असल्याचेही या वेळी घोषित करण्यात आले . या पत्रकार परिषदेला संघटनेचे अध्यक्ष काका कदम ,सचिटणीस रुपेश दर्गे , मुख्य प्रवक्ते ओवेस पेचकर व यशवंत गंगावणे उपस्थित होते .
ML/KA/PGB
13 Dec .2022