केंद्राने हटवली सोयाबीन साठ्यावरील बंदी

 केंद्राने हटवली सोयाबीन साठ्यावरील बंदी

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क)  : केंद्र सरकारने तेलबिया आणि सोयाबीनच्या साठ्यावरील  निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सोयाबीनच्या दरवाढीची शक्यता निर्माण झाल्याने अवकाळी पावसाने ग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकेल.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनचे दर सध्या तेजीत आहेत. मात्र देशातील बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढल्याने आणि तसेच साठा मर्यादेमुळे दर कमीच होते. मात्र साठा हटवण्याच्या या निर्णयामुळे आता सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळण्याची आशा निर्माण झाल्याने शेतकरी वर्गासाठी ही आनंदाची बातमी ठरू शकते.

SL/KA/SL

3 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *